मी श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे, जुना साधक असून मी एक १० दिवसांचे विपश्यना शिबिर पूर्ण केले आहे. दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी धम्मपुण्ण, स्वारगेट येथे आयोजित केलेल्या सत्रामध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती त्या विनंतीला मान्यता मिळाली त्याबद्दल सबका मंगल हो या सत्रासाठी माझ्या मनात असलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत. दैनंदिन आयुष्यात विपश्यना साधना सातत्याने टिकवण्यासाठी कोणत्या मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित करावे? गुरुजींनी शिकवलेल्या अनुपान व विपश्यना तंत्राचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापर कसा करावा? घरगुती, व्यावसायिक किंवा सामाजिक परिस्थितीत प्रतिक्रिया न देता समत्व ठेवण्यासाठी कोणती व्यावहारिक पद्धत उपयोगी ठरते अजपा–अनिच्चा निरीक्षणात येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा? गृहस्थ जीवनातील धम्माचा संतुलित वापर आणि साधना—यामध्ये समतोल कसा राखावा? या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी माझा अर्ज स्वीकारावा ही नम्र विनंती. धन्यवाद. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे 1) साधना संबंधित श्वासावरची जागरूकता वाढवण्याच्या पद्धती बैठकीत स्थिर राहण्यासाठी मार्ग त्रिकाल साधनेतील सुधारणा रोजच्या साधनेत येणाऱ्या सामान्य अडचणी 2) व्यवहारधम्म कामाच्या ठिकाणी किंवा घरी समत्व राखणे राग, भीती, चिंता यावर धम्माचा उपयोग दैनंदिन जीवनात अनिच्चा कशी पाहावी 3) गुरुजींच्या शिकवणुकीचे स्पष्टीकरण १० दिवसांत दिलेल्या ठोस मुद्द्यांचे दैनंदिन उपयोग अर्धा तास सकाळ, अर्धा तास संध्याकाळ’ याची शिस्त कशी ठेवावी 4) दीर्घकालीन साधना पुढील शिबिरे कधी आणि केव्हा करावीत दैनंदिन साधनेची प्रगती कशी तपासावी
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 – आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे वंचित होलार समाज बांधवांसाठी – जात प्रमाणपत्र विशेष अभियान श्री. बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे मुख्य सल्लागार यांच्या सल्ल्याने अँड. जी .एन . ऐवळे कायदे तज्ञ तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील अनेक वंचित होलार समाज बांधवांकडे आजही जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे शिक्षण, नोकरी, शासकीय योजना आणि इतर हक्कांपासून ते वंचित राहतात. या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन होलार समाज सामाजिक संस्था यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, महसूल विभाग, बार्टी (पुणे) आणि समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयातून विशेष जात प्रमाणपत्र अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत : तालुका व गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत समाजातील लोकांना विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व पडताळणीबाबत मार्गदर्शन व मदत केली जाणार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांचे आवाहन नामदेवराव आयवळे यांनी अनेक महत्त्वाचे संदर्भ देत असे सांगितले की : “जात प्रमाणपत्र मिळवणे ही केवळ कागदपत्रांची प्रक्रिया नसून समाजाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक सामाजिक बांधिलकी आहे. प्रत्येक समाज बांधवाने या प्रक्रियेत स्वतःहून पुढाकार घ्यावा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि नियमित पाठपुरावा करावा.” तसेच, आवश्यक कागदपत्रांची माहिती, अर्ज प्रक्रिया व अन्य सर्व मार्गदर्शनासाठी होलार समाज सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा असेही त्यांनी आवर्जून सांगितले. होलार समाज बांधवांसाठी आवाहन ज्या समाज बांधवांकडे जात प्रमाणपत्र नाही किंवा पडताळणीची प्रक्रिया प्रलंबित आहे, त्यांनी त्वरित खालील गोष्टी कराव्यात : संस्थेशी संपर्क साधावा आवश्यक कागदपत्रांची यादी मिळवावी आगामी शिबिरांमध्ये सक्रीय सहभाग घ्यावा अर्ज व पडताळणीसाठी संस्थेच्या मदतीचा लाभ घ्यावा होलार समाज सामाजिक संस्था वतीने आपण सर्वांना आवाहन – “जात प्रमाणपत्र घ्या – आपला हक्क सुरक्षित करा!”
https://holarsamajssp.blogspot.com/ https:// holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 – आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था महाराष्ट्रातील वंचित होलार समाजासाठी स्वतंत्र विभागीय कार्यशाळा आयोजित करण्याबाबत मा.बबनराव करडे नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने अँड. जि.एन.ऐवळे कायदे तज्ञ पुणे संस्थेचे सल्लागार यांच्या मार्गदर्शनात. होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी सातत्याने मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून मा. धम्मज्योती गजभिये साहेब, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन, प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे यांनी विभागीय कार्यशाळांना मान्यता दिली. यानंतर मा. सुनीलजी वारे सर, महासंचालक, बार्टी, पुणे यांनी तत्परतेने अंमलबजावणीला सुरुवात केली. होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी विभागीय कार्यशाळा अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या उपक्रमाबद्दल बार्टीचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. होलार समाजातील हजारो बांधवांना प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र/जात पडताळणी प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, विविध शासकीय योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य इत्यादी माध्यमांतून मोठा फायदा होत आहे. यामुळे समाजातील कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होत असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टी कटिबद्ध असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले आहे . आणि ते प्रत्यक्षात कार्यवाहीही करत आहेत. आजपर्यंत खालील विभागीय कार्यशाळा संपन्न झाल्या आहेत : पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यशाळा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळा मराठवाडा विभागीय कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यशाळा उर्वरित विभागीय कार्यशाळा देखील लवकरच आयोजित करण्यात येतील. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य (ISO 9001:2015) शाखा स्थापन करण्याबाबत सूचना होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असणारी होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य ही संस्था महाराष्ट्रातील विविध भागांत शाखा विस्तार करण्यास उत्सुक आहे. महाराष्ट्रभरातून शाखा स्थापन करण्यासाठी मागण्या प्राप्त होत आहेत. शाखा स्थापन करण्याची प्रक्रिया १. अर्ज व शुल्क संस्थेचे उद्देश, ध्येय व घटना मान्य असलेल्या इच्छुकांनी ₹2000/- भरून लेखी प्रस्ताव कार्यकारी मंडळाकडे सादर करावा. शाखा सलंग्न (Affiliated) म्हणून कायम ठेवण्यासाठी दरवर्षी एप्रिल महिन्यात ₹1000/- संस्थेकडे भरावे. २. मंजुरी प्रस्तावाची छाननी करून कार्यकारी मंडळ मंजुरी देईल. मंजूर झाल्यानंतर संबंधित शाखेस मुख्य शाखेकडून अधिकृत "आश्वासनपत्र / संलग्नता प्रमाणपत्र" दिले जाईल. ३. शाखेची कामकाज जबाबदारी संलग्न शाखेने आपल्या कार्याचे वार्षिक त्रोटक कार्यवृत्त संस्थेकडे पाठवणे बंधनकारक आहे. शाखेच्या आर्थिक व्यवहारास संस्था जबाबदार राहणार नाही. ४. सभासद संख्या व क्षेत्रनियोजन ज्या विभागात शाखा सुरू करायची आहे तेथे किमान 25 सभासद नोंदणी करणे आवश्यक. शक्यतो एक विभागात एकच शाखा ठेवण्याचे धोरण. पुढील विस्तारासाठी (उदा. जिल्हा शाखा) अंतिम निर्णय कार्यकारी मंडळ घेईल. महत्त्वाची नोंद वार्षिक शुल्क न भरल्यास शाखा रद्द करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला असेल. सर्व शाखांनी संस्थेच्या नियमावलीनुसार व शिस्तीने कार्य करणे बंधनकारक आहे.
Subscribe to:
Comments (Atom)
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...
