होलार समाज सामाजिक संस्था, पुणे (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या वतीने नवीन वर्ष नवीन संकल्पना १.१. २०२५ पासून स्त्री संसाधन केंद्र सक्षमा कक्षाची स्थापना कौटुंबिक सल्ला'आजच्या काळाची वाढती गरज आहे. सुखी अर्थव्यवस्था, चंगळवाद यामुळे आर्थिक व सामाजिक उलथापालथ होत आहे. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे यामुळे ताण तणाव वाढत आहे. छोट्या विभक्त कुटुंबांमध्ये नातेसंबंधातून मिळणारा आधार अपुरा ठरत आहे. स्त्री- पुरुषांच्या भूमिका, परस्पराकडूनच्या अपेक्षा बदलत आहेत. त्यामुळेही कुटुंबामध्ये कलहा निर्माण होतात. याचा परिपाक म्हणजे आपल्यापैकी अनेकांना मानसिक व भावनिक समक्षाने ग्रासले आहे. अन्याय, अत्याचार, दैनंदिन स्पर्धा, ताणतणाव, कुटुंबातील विसंवाद यामुळे निर्माण होणाऱ्या भावनिक स्वरूपाच्या समस्यावर मात करण्यासाठी नातेवाईक, मित्र- मैत्रिणी यांच्याशिवाय तज्ञ अनुभवी सल्लागार, मनोज मानसोपचार तज्ञ यांची मदत अनेकदा घ्यावी लागते, कौटुंबी समस्या अनेक प्रकारच्या असू शकतात. उदा उदा. पालक व मुले तसेच भाऊ, दोन जावा, सासू- सुना यांच्या तक्रारी असू शकतात. या तक्रारीतून प्रकरण युकोपाला जाण्यापूर्वी कोणीतरी मध्यस्थी केली तर फायदा होऊ शकतो. घरातील तथा इतर नातेवाईकांनी तशी मदत केली तर ती परिणामकारण होतेच असे नाही. पण त्रयस्ताच्या मध्यस्थीत दोन्ही बाजूला न्यायाची खात्री वाटते. म्हणून आपापसातील तक्रारी पोलिसात किंवा न्यायालयात नेण्यापूर्वी स्त्री (ससाधन सक्षम कक्ष) केंद्रात नेणे फायदेशीर असते अनेकदा समस्याग्रस्त व्यक्ती आपल्या समस्या बाबत स्वतःलाच अपराधी मानत असतात. माझ्याच बाबतीत असे का घडले आहे ? म्हणून स्वतःच्या नशिबाला दोष देत असतात. यातून निराश वाढते. कौटुंबिक- सल्लागार 'तुम्हाला या नैराश्यातून बाहेर काढून दिलासा देतो. मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकण्यास मदत करतो. खरे तर तुमची तुम्हालाच मदत करायची असते. सल्लागार ' तुम्हाला फक्त मदत करीत असतो. विवाहित जीवनात प्रेम, आपलेपणा, आदर या गोष्टी नाहिश्या होतात आणि जेव्हा व्यवहारिक दृष्टिकोन तयार होतो, कुटुंब कुटुंबव्यवस्थेत कलह, द्वेष, मत्सर या गोष्टीचे वर्चस्व निर्माण होते, तेव्हा कुटुंबव्यवस्था ढासळते व कलह निर्माण होतो. आजच्या नवीन बदलत्या काळात स्त्री- पुरुषातील वाढते स्पर्धा, एकमेकांच्या पुढे जाण्याची प्रवृत्ती त्यात स्त्रीचे नोकरी, शिक्षण यामध्ये वाढत चाललेले वर्चस्व यातून निर्माण होणारे वाद, वाढत्या महागाईमुळे कमी पडणारा पैसा, मुलांचे शिक्षण, घरातील स्त्री व पुरुष दोघेही नोकरी करीत असल्यामुळे घरातील व्यक्तींना पुरेसा वेळ न देणे या गोष्टीमुळेही कुटुंबिक कलहास खतपाणी मिळते. या सर्वातून सल्ला देण्यासाठी होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. महाराष्ट्रातील ठीक ठिकाणी स्त्री ससाधन केंद्र सक्षम कक्ष सुरू करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...